
राहुरी : वरवंडी येथे फायटर विमानातून निसटलेला बॉम्ब जमिनीत सात फूट खोल रुतला. त्यामुळे सहा फूट खोलीवरील शेतकऱ्यांच्या चार सायफनच्या जलवाहिन्या फुटल्या. घटनेला सात दिवस उलटले. बॉम्ब जिवंत असल्याने जलवाहिन्या जोडण्याची कामे रखडली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात शेतकऱ्यांची शेवटच्या एका पाण्यावर आलेली पिके जळायला लागली आहेत.