नगर : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये सहकारी पतसंस्थांच्या सुमारे चारशे कोटींच्या ठेवी, भागभांडवल अनेक वर्षांपासून अडकले आहेत.
अनेक आंदोलनानंतर बॅंक ठेवी परत देण्यास तयार होत नाही. याबाबत राज्य पतसंस्था फेडरेशनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर मार्ग करण्यासाठी तत्काळ बैठकीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती वसंत लोढा यांनी दिली.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये सहकारी पतसंस्थांच्या सुमारे चारशे कोटींच्या ठेवी, भागभांडवल अनेक वर्षांपासून अडकले आहेत.
या बाबत राज्य पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व स्थैर्यनिधी संघाने अनेकदा आंदोलने केली. शेतकरी कर्ज माफीचे पैसे शासनाकडून जमा होताच पतसंस्थांचे पैसे परत देऊ, असे आश्वासन दिले होते.
शासनाचे कर्जमाफीचे पैसे बॅंकेत जमा होऊनही बॅंक पतसंस्थांच्या ठेवी परत करत नव्हती. त्यामुळे वसंत लोढा यांनी पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर 28 ऑगस्टला प्रभारी सहकार मंत्री जयंत पाटील यांच्या कक्षात राज्य पतसंस्था फेडरेशचे अध्यक्ष काका कोयटे व पदाधिकाऱ्यांसह बैठक झाली.
या तोडगा काढण्यासाठी तत्काळ बैठक घ्या, असा आदेश संबंधितांना दिला आहे. त्यामुळे निबंधकांनी बैठक बोलविण्याची मागणी करण्यात आली आहे.
संपादन - अशोक निंबाळकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.