
अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून शासकीय कर्माचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनामुळे मार्चमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात आली होती. ती रक्कम कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या पगारात ही रक्कम दिली जाणार आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून सरकारचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कपात करण्यात आला होता. आता कपात केलेला पगार देण्याचे आदेश सरकारने दिला आहे. मार्चमध्ये लोकप्रतिनिधी, गट अ, ब वर्ग व क वर्गातील कर्मचाऱ्यांचे पगार कपात करण्यात आले होते.
कोरोनाच्या पर्श्वभूमीवर राज्यात मार्च व एफ्रिलमधील पगार दोन टप्यात करण्याचा निर्णय सरकाने घेतला होता. पहिल्या टप्यात लोकप्रतिनिधी, अ, ब, क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांचे पगाराची टक्केवारी निश्चित करण्यात आली होती. जुलैमधील वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे देण्याचे काम सुरु आहे. या प्रणालीत एकावेळी एकच कर्मचारी ‘बील ग्रुपला’ जोडता येतो. त्यामुळे जुलै व ऑगस्टमधील वेतन झाल्यानंतर मार्चच्या दुसऱ्या टप्यातील उर्वरीत वेतनाचे देयक सेवार्थ प्रणालीतून दिले जाणार आहे. गणेशोत्सवापूर्वी ही रक्कम द्यावी, असेही याबाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. सरकारच्या वित्त विभागाने हे परिपत्रक काढले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.