पिकांचे नुकसान केल्याने महापारेषणविरोधात शेतकरी आक्रमक

Mahapareshan
Mahapareshan

अमरापूर : तालुक्‍यातील अमरापूर येथे महापारेषणच्या विद्युत मनोऱ्यावर तारा ओढताना पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. भरपाई मिळेपर्यंत काम सुरू होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

अमरापूर येथे महापारेषण कंपनीच्या वतीने 220 केव्ही केंद्राची उभारणी करण्यात आली. या केंद्रास औरंगाबाद जिल्ह्यातील थापटी तांडा येथून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी थापटी तांडा ते अमरापूरदरम्यान विद्युत मनोरा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. अमरापूर केंद्राचे कामही दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मनोऱ्यावर वीजवाहिन्या ओढण्याचे काम बाकी होते. ते सध्या ठेकेदाराने सुरू केले आहे. 

तालुक्‍यातील ठाकूर निमगाव परिसरात या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमुळे व तारांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत मच्छिंद्र कातकडे, नानासाहेब काकडे, संभा कातकडे, परमेश्‍वर निजवे, पांडुरंग काकडे, बबन खंडागळे, रामेश्‍वर निजवे, जालिंदर निजवे यांच्यासह शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. यापूर्वीही या कामामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. आताही तीच स्थिती आहे. त्यामुळे भरपाई मिळाल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

विद्युत मनोरा व वीजवाहिन्या ओढण्याच्या कामामुळे दोन ते तीन वेळा शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित कंपनी व ठेकेदार शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे केवळ आश्‍वासन देत आहे. भरपाई मिळेपर्यंत पुढील काम होऊ देणार नाही. 
- सुनीता कातकडे, सरपंच, ठाकूर निमगाव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com