

-सुहास वैद्य
कोल्हार : रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी धावणारी रुग्णवाहिका, तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करणाऱ्या क्रेनलाही वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडावे लागते. दोन्ही साधने तातडीच्या सेवेत मोडतात. त्यांनाही मोकळी वाट मिळत नाही. यासारखे दुसरे दुर्दैव नाही. अशा बिकट प्रसंगी रुग्ण दगावल्यावर तो दवाखान्यात पोहोचविणार का?, तसेच क्रेनला अपघातस्थळी पोहोचताच येत नसेल, तर अपघातग्रस्त वाहने कशी हटविली जाणार? ही गंभीर समस्या आहे.