आमचं पीक नाही ओ नशीबच पाण्यात बुडाले; पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भावना

Loss of farmers in Rahata taluka due to rains
Loss of farmers in Rahata taluka due to rains

शिर्डी (अहमदनगर) : देशात सत्ताधारी व विरोधी पक्षांना एकाच वेळी शेतकऱ्यांचा मोठा पुळका आला. कोणी रस्त्यावर कृषि विधेयकाची होळी करतोय. तर कुणी ही विधेयके तुमच्या भल्यासाठी असल्याचा दावा करतो. एकीकडे शेतीवर उपजिवीका नसलेल्यांची ही उठाठेव सूरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षांना पावसाने पाण्यात बुडवून टाकले आहे. एक एकर बाजरी सोंगायला मजुर त्याच्याकडे सहा हजार रूपये मागतात. खिसा रिकामा झाला. भरपाई देण्याऐवजी त्याच्यापुढे विधेयकांची कागदे नाचवीण्याचा अजब खेळ सुरू झाला आहे. 

तालुक्यातील जळगाव हे आदर्श शेती करणारे गाव. महाबिज कंपनीच्या सोयाबिन बियाणाचे उत्तम सिड प्लॅाट येथे घेतले जातात. येथील द्राक्षबागा पहायला दुरवरून शेतकरी येतात. तिन दिवसांपूर्वी येथे अवघ्या दोन तासात सत्तर मिलीमिटर पाऊस झाला. आधिच ओल्या असलेल्या जमिनीत तळी साचली. त्यात खरिपाची पिके अक्षरशः बुडून गेली. सोयाबीन आणि द्राक्षबागांचे शंभर टक्के नुकसान झाले. शेती नव्हे शेतक-यांचे भवितव्य पाण्यात बुडाले.

गंगाधर पाटील चौधरी व भाऊसाहेब पाटील चौधरी हे येथील जाणकार आणि प्रतिष्ठीत शेतकरी. त्यांनी पिकविलेला उस पहायला कृषि विद्यापिठाचे कुलगूरू शेतावर येतात. यंदा उस खाली लोळला. पांढरी व तपकिरी ठिपक्याने त्याचा सत्तानाश केला. सोयाबिन पाण्यात बुडाले. द्राक्षबागांची मुळे कुजली आणि जमिनी एेवजी शेंड्याकडे नवीन मुळे फुटली. शंभर टक्के नुकसान. त्याला पंचनाम्याची मुळीच गरज नाही. एवढे नुकसान आणि पाऊस गेल्या आम्हाला आठवते तसे पन्नास ते साठ वर्षात अनुभवला नाही. मायबाप सरकारने तातडीने व सरसकट भरपाई दिली तरच गावातील शेतकरी रब्बीची पिके घेऊ शकतील. अन्यथा पाणी असून शेती पडीत राहील. अशी कैफीयत हताश झालेल्या शेतक-यांनी मांडली. सामान्य शेतक-यांची तर पुरती दैना उडाली. 

हि परिस्थीती केवळ आदर्श शेती करणा-या या जळगाव गावापुरती मर्यादित नाही. संपूर्ण तालुक्यातील खरिप पिके, फळबागा आणि उसाच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले. अशा संकट काळात पंचनाम्याचा फार्स न करता. पर्जन्यमापकावरील नोंदी लक्षात घेऊन सरसकट मदतीचा निर्णय घ्यायला हवा. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधीपक्षांनी काही तरी करायला हवे. त्या एेवजी ज्यांची शेतीवर उपजिवीका नाही. अशी मंडळी शेतक-यांचा कैवार घेऊन एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

संकटात बुडालेल्या शेतक-याला भरपाई व बिन व्याजी कर्ज देऊन आधार देण्याएेवजी कृषि विधेयकावरून तंटा उभा करण्यात आला. शेतक-यांचे कैवारी कोण यावरून भांडणे सुरू झाली. पाण्यात बुडालेली शेती पहायला मात्र कुणाला वेळ नाही. 
रावसाहेब गाढवे (उस उत्पादक शेतकरी) : खरिप आणि उस पिकाचे फार मोठे नुकसान झाले. भरपाईची घोषणा सत्ताधा-यांनी केली नाही. विरोधकांनी त्यासाठी आंदोलन केले नाही. कृषि विधेयकावरून एकमेकाच्या विरोधात भांडणे सुरू आहेत. हे पाहून फार वाईट वाटते.

मच्छींद्र टेके पाटील (शेती प्रश्नाचे जाणकार) : ही वेळ शेतकऱ्यांना अर्थिक आधार देण्याची आहे. भरपाई मिळवून देण्याची आणि पाण्यात बुडालेली शेती पून्हा उभी करण्याची आहे. सामान्य शेतक-याकडे घरखर्चाला पैसे नाहीत. त्याचा कैवारी कोण यावरून शेतकरी नसलेल्यांची भांडणे सूरू आहोत. गमंत याची वाटते यातील दोघांचेही प्रपंच शेतीवर अवलंबून नाहीत. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com