श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) : दौंड- मनमाड रेल्वे मार्गावरील अशोकनगर परिसरात २५ वर्षीय एका तरुणाने रेल्वेसमोर येवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. सदर तरुण तालुक्यातील उक्कलगाव येथील रहीवाशी असून शिक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून तो येथील कांदा मार्केट परिसरात राहत होता.
अक्षय अनिल पावसे असे त्याचे नाव असून मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी अशोकनगर परिसरात एका एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या इंजीनसमोर येवून त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. प्रारंभी तरुणाची ओळख पटत नव्हती.
मृतदेहाच्या उत्तरणीय तपासणीसाठी येथील कामगार रुग्णालय आणले. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटली. सदर तरुण तालुक्यातील उक्कलगाव येथील रहीवाशी असून गेल्या काही दिवसापासून तो कांदा मार्केट परिसरात राहत असल्याचे पोलीसांनी सांगितले.
त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. अद्याप आत्महत्या केल्याचे कारण समजलेले नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.