Pathardi News : ‘गोदावरी’ त दुष्काळी गावांचा समावेश करा, मोनिका राजळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नागपूर येथे राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली.
monika rajale
monika rajaleSakal
Updated on

पाथर्डी : नदीजोड योजनेच्या माध्यमातून जायकवाडी व मुळा धरणातून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी गोदावरी खोरे परिसरात ऐंशी टीएमसी पाणी वळविण्याचे शासनस्तरावर प्रस्तावित आहे. या योजनेत पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गोदावरी खोरे परिसरातील कायम दुष्काळी गावांचा सामावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com