पारनेर - पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा नेवासे, शेवगांव, गेवराईमार्गे श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारकडून स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.