Farmers celebrate the Mula Dam's water release, which provides vital irrigation to revive Rabi crops and offers hope for the summerSakal
अहिल्यानगर
Mula Dam : मुळा धरणाच्या आवर्तनाने शेतकरी सुखावले: रब्बी पिकांना जीवदान; उन्हाळा कडेला लागण्याची आशा
Ahilyanagar News : जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा धरणातून रब्बीचे आवर्तन देण्याची सूचना केल्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मुळा धरण येथे कळी दाबून कालव्याला आवर्तन सोडले होते.
सोनई : राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्यासाठी तारणहार असलेल्या मुळा धरणातून रब्बीचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा धरणातून रब्बीचे आवर्तन देण्याची सूचना केल्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मुळा धरण येथे कळी दाबून कालव्याला आवर्तन सोडले होते.

