
राहुरी: मुसळवाडी येथील ब्रिटिशकालीन तलाव पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरला आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे मुसळवाडी तलावात पाणी सोडण्यात आले. या तलावातून पिण्याच्या पाणी योजना व शेती सिंचनासाठी पाणी दिले जाते. सुमारे २० गावांचा पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे तलावाच्या लाभधारक गावांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.