श्रीगोंदे - राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेकडो किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देतात. अलीकडच्या काळात या किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. राज्य सरकारने किल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून ही बाब दुर्दैवी असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील हे बहादूर गडावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, खासदार नीलेश लंके यांनी गडकोट किल्ल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली हा स्तुत्य उपक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्यांचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे.
सरकारकडे किल्ल्यांच्या डागडुजीसाठी वेळ अन् निधी नाही. येथील धर्मवीरगडावर छत्रपती संभाजी महाराजाना कैद करून आणण्यात आले होते. या ठिकाणचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात कोरून ठेवलेला आहे.
पण तुलनेत इथे सरकारने विशेष लक्ष दिले नाही. धर्मवीरगडाचे संवर्धन करण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार नीलेश लंके, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
डिंभे ते माणिकडोह बोगदा होणे गरजेचे - पाटील
डिंभे ते माणिकडोह बोगद्याविषयी विचारले असता ते म्हणाले, मी जलसंपदा मंत्री असताना हा विषय आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला. डिंभे धरणाचा आंबेगाव अन् शिरूर तालुक्याला फायदा होतो. तेथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या वाट्याच्या पाण्याला हात न लावता हा बोगदा होणे गरजेचे आहे. हा बोगदा झाल्यास लाभक्षेत्रात तीन टीएमसी पाणी अधिक उपलब्ध होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.