
-राजू नरवडे
संगमनेर : संगमनेर शहरासह घुलेवाडी येथे कोट्यवधी रुपये खर्च करून काही वर्षांपूर्वी प्रशस्त व भव्य दिव्य अशा इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, आज या इमारतींच्या भिंती आणि कोपरे तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. यामुळे अनेक जण नाके मुरडताना दिसत आहेत.