परप्रांतीय परागंदा ः पुणे-मुंबईकरांनी पुन्हा धरली गावची वाट

कोरोनामुळे लोकांनी घर गाठायला सुरूवात केलीय
People from Pune and Mumbai have gone to the village
People from Pune and Mumbai have gone to the villageesakal

पारनेर ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून नियमावली कडक केली जात आहे. त्यामुळे परप्रातांतून कामाधंद्यासाठी पारनेरात आलेल्या मजुरांचे व पारनेरातील पुणे व मुंबईत उदरनिर्वाहासाठी गेलेले लोंढे पुन्हा गावाकडे निघालेले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच चितेंत भर पडलेली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात 30 एप्रिलपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यात एक मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे बेकार बसून काय करायचे असा विचार करून परप्रांतातून आलेल्या मजुरांनी आपल्या घराकडे जाणे पसंत केलेले आहे.

People from Pune and Mumbai have gone to the village
संयम सुटला : सिव्हिल हॉस्पिटलची नातेवाईकांकडून तोडफोड

आपल्या बिऱ्हाडासह परप्रांतीय मजूर मिळेल, त्या साधाने गाव जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथील सुपे बसस्थानक तसेच नगर-पुणे महामार्गावरही चौकात आपल्या कुटुंबासह उपाशी पोटी तास न्‌ तास वाहनांची ते वाट पहात आहेत.

शनिवारी (ता. 17)ला सकाळी सात ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे मजूर बसची प्रतीक्षा करीत होते. सकाळपासून थांबलेल्या विदर्भ मराठवाड्यातील मजुरांना बस मिळाली ना जेवणाची त्यांची सोय झाली होती. मागील लॉकडाउनमध्ये या मजुरांच्या जेवणाची सोय करण्यात आलेली होती. मात्र अद्याप तशी सोय सुरु न झाल्याने या मजुरांचे हाल होत आहे. काहींनी बस येत नसल्याने पायी जाणे पसंत केले.

पारनेरातून जसे परप्रांतियांचे लोंढे गावाकडे निघालेले आहेत. तसेच लोंढे पारनेरात येऊ लागलेले आहेत. पुणे, मुंबई व कल्याणमध्ये उदरनिर्वाहासाठी पारनेरमधून अनेकजण गेलेले आहेत. मात्र वाढत्या कोरोनामुळे अनेकांनी शहरापेक्षा आपले गावच बरे म्हणत गावाचा रस्ता धरलेला आहे. जाणाऱ्यांविषयी मनात खंत व्यक्त करून येणाऱ्यांची धास्ती मात्र पारनेरकरांनी घेतली आहे.

महसूलमंत्र्यांच्या बोलाने पारनेरकरांनी सावरला तोल

पारनेरातील आढावा बैठकीत महसूलमंत्र्यांनी पारनेकरांचा मुंबई व पुण्याचा जवळचा संबंध आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाल्याने मुंबई व पुण्यातील पारनेरकर पुन्हा गावी येत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने पाहुण्यांना गावी आल्यानंतर दहा दिवस क्वारंटाईन करा, असे सूचित केलेले आहे. त्यामुळे पारनेरकरांचा तोल साधला आहे.

बातमीदार - मार्तंड बुचुडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com