सरकार फेरआढावा घेत नसल्याने जनहिताच्या योजना कागदावरच : अण्णा हजारे 

Public interest schemes are not being implemented as the government is not reviewing
Public interest schemes are not being implemented as the government is not reviewing

पारनेर (अहमदनगर) : सरकार जनहिताच्या अनेक योजना जाहीर करते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना आदेशही देते. मात्र, या योजना राबविल्या जातात की नाही, याचा फेरआढावा घेतला जात नाही. त्यामुळे योजना कागदावरच राहतात. त्यातून समाजाचे मोठे नुकसान होते, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. 

राज्यातील शीव- पाणंद रस्ते खुले करावेत, तसेच राज्यातील शेततलाव व बंधाऱ्यांची गळती थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी "आवाज दो' हे जनआंदोलन सुरू केले आहे. त्याच्या पत्रकाचे विमोचन हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

शीव-पाणंद रस्त्यांसोबत शेततलाव व बंधाऱ्यांची गळती थांबविण्यासाठी हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे प्लॅस्टिक पेपर अस्तरीकरणाचा प्रयोग राबविला. त्यातून बंधाऱ्यांमधील गळती मोठ्या प्रमाणात थांबली. हा प्रयोग राज्यभर राबवावा, तसेच शीवरस्ते खुले करावेत, या मागणीसाठी पवळे जनजागृती अभियान, तसेच सरकारला जाग यावी, यासाठी "आवाज दो' आंदोलन करीत आहेत. 

पवळे यांनी पूर्वीही तहसील कार्यालयासमोर अनेकदा आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले आहे. त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी त्यांनी नव्याने पुन्हा शीव-पाणंद रस्ते नवनिर्माण कृतिसमितीच्या माध्यमातून हे अभियान सुरू केले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com