पोहेगाव (अहमदनगर) : सर्वत्र चांगला पाऊस असल्याने व कांद्याला मध्यांतरी मिळालेल्या दरामुळे कांद्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पर्यायाने यावर्षी सर्वत्र कांदा बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा कोपरगावसह सर्वत्रच झाला आहे.
ज्यांच्याकडे बियाणे होती त्यांनी ती बियाणे 12 ते 18 हजार रुपये पायलीच्या दराने विकले. तर दुकानात विविध कंपन्यांचे बियाणे सुमारे साडेतीन हजार रुपये किलोने विकले गेले आहे. काही ठिकाणी यापेक्षाही जादा दराने बियाणे विक्री केली गेली आहे. कांद्याचे भाव मध्यंतरी दोन- तीन दिवस 12 हजाराच्या आसपास गेले होते. आताही पाच हजाराच्या आसपास भाव आहे.
सगळीकडे चांगला पाऊस झाल्याने हमखास दोन पैसे होतील या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे यावर्षी कल आहे. परंतु अगोदर टाकलेल कांदा बियाणे जास्त पावसामुळे नव्वद टक्के शेतक-याचे फेल गेले आहेत. आता जिथे मिळेल व जे मिळेल ते बियाणे आणुन पुन्हा रोप तयार करुन कांदा लागवड करण्याची तयारी शेतकरी करत आहे. पंरतु यात काही ठिकाणाच्या बियाणाची फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा बियाणे पुरेशा प्रमाणात उत्पादन न झाल्याने कांदा बियाणे पुरवठा मोठ्या प्रमाणावर होण्यात अडचण निर्माण झाली आहे. सर्वत्र शेतकऱ्यांची कांदा लागवडीसाठी कांदा बियाणे मागणी वाढली आहे. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध झालेले बियाण्यांपासून चांगल्या प्रकारची रोपे तयार करणे आवश्यक आहे. त्याकरिता कांदा रोपे तयार करीत असतांना शेतकरी बंधूंनी पुढील प्रमाणे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिलेला हा सल्ला
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.