अहिल्यानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला समानतेचा हक्क मिळाला आहे. आज या राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाले, त्या राज्यघटनेनुसार आपण समाजामध्ये काम करत आहोत. .Solapur News : दीड महिन्यापासून रखडले समांतरचे काम.संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. संविधानामुळे एकतेचा संदेश दिला जात असून, सर्व जाती- धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले..संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शपथ घेतली. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, ज्येष्ठ नेते अजय साळवे, मयूर बांगरे, जयंत गायकवाड, संजय खामकर, सिद्धार्थ आढाव, सुमित गायकवाड, ॲड. संदीप पाखरे, शहर अभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते. .जगताप म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या शहरामध्ये लवकरच उभारला जाणार असू, त्याची प्रतिकृती दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात बसविण्यात आली आहे. दुसरा पुतळा आपल्या शहरात बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील येथे २६-११ रोजी झालेल्या हल्ल्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. महाराष्ट्र मुंबई पोलिसांनी नेहमीच आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेचे संरक्षण करण्याचे काम केले असल्याचे जगताप म्हणाले..Ahmednagar News : चौक्या नको, हवे पोलिस ठाणेच !.संविधान सर्व भारतीयांचेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली आहे. राज्यघटनेमुळे सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सूत्रे आली. संविधान एका समाजापुरते नसून, ते सर्व भारतीयांचे आहे. संविधानाने देशात समता, बंधुता व स्वतंत्रता प्रस्थापित झाली आहे, अशी भावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी व्यक्त केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
अहिल्यानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला समानतेचा हक्क मिळाला आहे. आज या राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाले, त्या राज्यघटनेनुसार आपण समाजामध्ये काम करत आहोत. .Solapur News : दीड महिन्यापासून रखडले समांतरचे काम.संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. संविधानामुळे एकतेचा संदेश दिला जात असून, सर्व जाती- धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले..संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शपथ घेतली. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, ज्येष्ठ नेते अजय साळवे, मयूर बांगरे, जयंत गायकवाड, संजय खामकर, सिद्धार्थ आढाव, सुमित गायकवाड, ॲड. संदीप पाखरे, शहर अभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते. .जगताप म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या शहरामध्ये लवकरच उभारला जाणार असू, त्याची प्रतिकृती दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात बसविण्यात आली आहे. दुसरा पुतळा आपल्या शहरात बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील येथे २६-११ रोजी झालेल्या हल्ल्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. महाराष्ट्र मुंबई पोलिसांनी नेहमीच आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेचे संरक्षण करण्याचे काम केले असल्याचे जगताप म्हणाले..Ahmednagar News : चौक्या नको, हवे पोलिस ठाणेच !.संविधान सर्व भारतीयांचेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली आहे. राज्यघटनेमुळे सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सूत्रे आली. संविधान एका समाजापुरते नसून, ते सर्व भारतीयांचे आहे. संविधानाने देशात समता, बंधुता व स्वतंत्रता प्रस्थापित झाली आहे, अशी भावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी व्यक्त केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.