राज्यातील सरकार सर्वच परीक्षांमध्ये नापास- विखे पाटील

कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकून काम करण्याचे आवाहन
pune
punesakal
Updated on

श्रीरामपूर : राज्यातील सरकारकडे इच्छाशक्ती नसल्याने महाराष्ट्र राज्य अधोगतीकडे चालले आहेत. निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने महाविकास आघाडी सरकार सर्वच परीक्षांमध्ये नापास झाल्याची टीका माजीमंत्री तथा भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आमदार विखे पाटील आज (मंगळवारी) श्रीरामपूर तालुका दौऱ्यावर आले होते. दरम्यान, त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून संवाद साधला. गावपातळीवरचे प्रश्न जाणून घेत त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. (AhamadNagar News)

तालुक्यातील बेलापूर येथे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकून, नव्या विचाराने एकत्रित येवून काम सुरु करण्याचे आवाहन विखेपाटील यांनी केले. कोरोनाच्या संकटानंतर निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेत महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे भाष्य त्यांनी केले. विखे पाटील म्हणाले, सरकारमध्ये थोडीही इच्छाशक्ती नसल्याने कोणताही निर्णय घेवू शकत नाहीत. घेतलेले निर्णय मागे घेण्याची वेळ मंत्र्यावर येते. सरकारच्या आनास्थेमुळे सर्वाधिक नूकसान शिक्षण क्षेत्राचे झाले. शेवटपर्यत परीक्षा घ्यायची की नाही. हा निर्णय सरकार अद्याप करू शकले नाहीत.

pune
अखेर राणेंना दिलासा; महाड सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

सरकारला आॅनलाईन शिक्षण पध्दतीत येत असलेल्या अडचणीची जाणीव नाही. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी टॅब उपलब्ध करून दिले असते. तर गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण घेता आले असते. परंतू सरकारला गोरगरीबांसाठी काहीही करायचे नसल्याचा आरोप विखेपाटील यांनी केला. याप्रसंगी माजी सभापती दिपक पठारे, भाजपाचे पदाधिकारी प्रकाश चिते, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब तोरणे, राधाकृष्ण आहेर, नितीन भागडे, भास्कर बंगाळ, प्रफुल्ल डावरे, रणजीत श्रीगोड, शंतनू फोपसे उपस्थित होते.

युवकांनी स्टार्टअपकडे लक्ष घालावे

कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने बाजार समित्या बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादीत माल रस्त्यावर फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती. सरकारकडे शेतकरी हिताच्या कुठल्याही ठोस उपाययोजना नाहीत. परिणामी, आगामी काळात रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान आहे. युवकांनी स्टार्टअप मध्ये अधिक लक्ष ठेवून उद्योगांची माहीती जाणून घेत आपल्या भागातील युवकांच्या रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crores Spent, Yet No Clean Drinking Water: Ahilyanagar MPs Target Administration
Dr. Sujay Vikhe Patil Assures Faster Completion of Ahmednagar–Savali Vihir Highway Project
Enrollment Crisis Hits Ahmednagar: 75 Zilla Parishad Schools Locked in Nine Years
MP Nilesh Lanke Orders Quality Road Construction as Per Sanctioned DPR
Marathi News Esakal
www.esakal.com