राहुरी (नगर) : राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाचे कामकाज ऑनलाइन झाले. त्यासाठी असलेल्या डीआयएलआरएमपी सर्व्हरचा वेग मंदावला आहे.
मागील तीन महिन्यांपासून बहुतांश वेळा सर्व्हर बंद असतो. सात-बारा उतारे ई-फेरफार यांच्या ऑनलाइन नोंदी होत नाहीत. कामकाज वारंवार ठप्प होते. त्यामुळे शेतकरी, खातेदारांशी वाद होत आहेत. सर्व्हरची क्षमता व वेग वाढवावा, अन्यथा कार्यालयीन वेळेनंतर कामकाज केले जाणार नाही, असा इशारा तलाठी व मंडलाधिकारी संघटनेने दिला आहे.
तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना तसे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की कार्यालयीन वेळेत सकाळी साडेअकरा ते सायंकाळी पाचदरम्यान सर्व्हर डाऊन असतो. शेतकऱ्यांना सात-बारा उतारे देणे, फेरफारसंबंधी कामकाज करणे यामुळे शक्य होत नाही.
नोंदींचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत आहे. तसे खातेदारांना सांगितले तर ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यामुळे तलाठी व खातेदार यांच्यात वारंवार वाद होतात. रात्री उशिरा सर्व्हर सुरू झाला, तरी वेग नसल्याने कामकाज उरकत नाही.
संपादन - सुस्मिता वडतिले
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.