
संगमनेर ः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी बदली झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्याची बाब लक्षात घेतली पाहिजे. या सर्व विषयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्तिशः लक्ष घालत आहेत. त्या पत्राच्या सत्यतेबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनाच शंका वाटत असल्याने, त्याबाबत आम्ही वेगळे काही बोलणे मला आवश्यक वाटत नाही. मात्र, या प्रकरणामुळे राज्य सरकारला कोणताही धोका पोचण्याची शक्यता नाही, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले.
माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री थोरात यांनी सावध पवित्रा घेतला. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपविल्याने त्यात केंद्राचा हस्तक्षेप वाढला का, यावर थोरात म्हणाले, शेवटी ते तपास करीत आहेत. याप्रकरणी दोषी असतील, त्यांना शिक्षा होणार असून, शेवटी सत्य बाहेर येईलच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.