
अहिल्यानगर : अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. एप्रिल आणि मे या दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील १० हजार ६४८ हेक्टर क्षेत्रातील फळबाग, उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. २३ हजार ४४५ शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसला होता. या शेतकऱ्यांसाठी १८ कोटी ९३ लाख ६ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.