कोविडबाबत नियोजनात केंद्र अपयशी : जलसंपदामंत्री जयंत पाटील

जयंत पाटील
जयंत पाटील
Summary

देशातील सर्व राज्यांत कोविडच्या लसींचे योग्य नियोजन करण्यात केंद्राला अपयश आल्याची टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.

संगमनेर (अहमदनगर) : कोरोनाविरोधी लसीची (vaccines) देशात निर्मिती झाल्यानंतर सुरवातीच्या काळात त्या लसींचा (vaccines) उपयोग देशवासीयांसाठी करण्याऐवजी परदेशांत साडेसहा कोटी लसींची निर्यात केली. या निर्णयाचे दुष्परिणाम दिसत आहेत. देशातील सर्व राज्यांत कोविडच्या (Covid) लसींचे योग्य नियोजन करण्यात केंद्राला अपयश आल्याची टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील (water resources minister jayant patil) यांनी केली. (water resources minister jayant patil criticized the center for failing to properly plan covid vaccines in all the states of the country)

जयंत पाटील
संगमनेर पुन्हा कोरोनाच्या रडावर, साडेसातशे रूग्ण

संगमनेर तालुक्‍यातील जवळे कडलग येथे निळवंडे प्रकल्पाच्या जलसेतूच्या पाहणीसाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाले असतानाही राज्य सरकार केंद्र सरकारच्या नावाने ओरडत असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच केली. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की लस देण्याचे नियोजन केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून ते ढासळलेले आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांना वेळेत दुसरा डोसही मिळाला पाहिजे, याचे भान केंद्राला हवे.

जयंत पाटील
जुन्नर, संगमनेर तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दुसरी लस वेळेत मिळावी, तसेच 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी तातडीने लसीकरण सुरू करावे हा आमचा आग्रह आहे. देशात लस निर्माण करणाऱ्यांवर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने, आवश्‍यकतेनुसार लसींचा साठा मिळत नाही. अन्यथा, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण व जिल्हा रुग्णालये या सर्व व्यवस्थेतून महाराष्ट्र लसीकरणाचा कार्यक्रम वेळेत पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनावर राज्यातील काही जिल्हे वगळता नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे.

मुंबई- पुण्यासारख्या महानगरांतही बाधितांची संख्या कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी राज्य सरकार प्रभावी उपाययोजना राबवीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील
संगमनेर बाजार समितीत प्रवेशावर निर्बंध

तौक्‍ते वादळामुळे झालेल्या हानीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईच्या समुद्रातील ओएनजीसीच्या "बाज'प्रकरणी राज्य सरकारवर ठपका ठेवत आशिष शेलार यांनी टीका केल्याविषयी बोलताना ते म्हणाले, 'हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत चालते. त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. वादळाबाबत आठ दिवस अगोदर पूर्वसूचना व इशारे देऊनही त्यांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले नाही. पोलिस या प्रकरणातील जबाबदारांची सखोल चौकशी करीत असून, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल.'' त्यामुळे प्रत्येक गोष्ट राज्य सरकारवर टीका करण्यासाठी वापरणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. (water resources minister jayant patil criticized the center for failing to properly plan covid vaccines in all the states of the country)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com