जलस्वराज योजनेचे कार्य अंतिम टप्प्यात 

The work of Jalaswaraj Yojana is in the final stage
The work of Jalaswaraj Yojana is in the final stage
Updated on

श्रीरामपूर (अहमदनगर) : शिरसगावसाठी 13 कोटी रुपयांचा निधी खर्च करून जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या जलस्वराज-दोन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, डिसेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे. पाण्याची टाकी, पाइपलाइन, यांची चाचणी पूर्ण झाली असून, पुढील दोन दिवसांत ग्रामस्थांना नळजोडणी मिळणार असल्याची माहिती सरपंच आबासाहेब गवारे यांनी दिली. 

शिरसगाव येथे मीटरद्वारे शुद्ध पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांची समाधान व्यक्त केले. गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी परिसरातील अशोक बंधाऱ्याच्या खोलीकरणाचे काम ग्रामपंचायतीने लोकसहभागातून केले. उन्हाळ्यात पाणीटंचाई व दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी शिरसगाव ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यासाठी जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतीने पाठपुरावा केल्याने शिरसगावसाठी जिल्हा परिषदेने जलस्वराज-दोन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यामुळे शिरसगाव ग्रामस्थांना मीटरद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. 

संपादन : अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream
DNA Test to Solve Rahuri Burial Mystery After Missing Man Reappears Alive
Temple Visit Turns Political: Srikant Shinde Slams Opposition Over Hindutva Stand
Satyajeet Tambe
Marathi News Esakal
www.esakal.com