अकोला ः महात्मा जोतीराव फुले पीक कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण प्रक्रिया न झालेले २५ हजार ६०५ शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरू झाला तरी कर्जमुक्ती लाभ मिळू शकला नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अडलेले कर्जमुक्तीचे घोडे आता पुन्हा धावू लागले असून, सेवा सहकारी संस्थेचे गटसचिव यांचेकडे व सेतू केंद्रांवर गुरुवारपासून (ता.१८) आधार प्रमाणीकरणाला सुरुवात झाली आहे.
अकोला जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या सुमारे २५ हजार ५०५ शेतकरींना कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नाही. परिणामी त्यांना खरीप हंगाम सुरू होऊनही नवीन पीक कर्ज घेता आले नाही. मार्चपासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आधार प्रमाणीकरणाचे काम थांबविण्यात आले होते. याबाबत शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्यानंतर सहकार विभागाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व सामाजिक अंतर पाळून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधिक (सहकार) डॉ.प्रवीण लोखंडे यांनी दिली.
कर्जमुक्तीवर नजर
- बँकांकडे नोंदणी ः १, ०९६३०
- पात्र शेतकरी ः १,००३६६
- आधार प्रमाणीकरण ः ७४,६१९
- प्रमाणीकरणाच्या प्रतीक्षेत ः २५६०५
- कर्ममुक्तीचा लाभ मिळाला ः ७०,७९८
- कर्जमाफीची रक्क ः ४४६.०८ कोटी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.