

Akola
esakal
अकोला: उन्हाळ्यातील अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर शासनाकडून दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी ३३ गावांतील २७२ शेतकऱ्यांच्या १९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानभरपाईपोटी ४० लाख ९२ हजारांची मदत मंजूर करण्यात आली आहे. या निधीमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळणार आहे.