

Akola News
esakal
अकोला: जिल्ह्यात साेमवारी (ता. ३०) रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार दिसून येत आहे. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ६५३.३ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली असून यात कांदा, चीया, गहु, लिंबू भाजीपाला पिकांची नासाडी झाली आहे.