

Akola
esakal
कारंजा: पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या अमरावती येथील वारकरी अण्णाजी भोयर यांचे परतीच्या प्रवासादरम्यान निधन झाले आहे. प्राप्त माहितीनुसार शनिवारी (ता. १८) सायंकाळी आठच्या सुमारास आषाढी वारी करून पंढरपूरहून आपल्या गावी परतत असताना एका ज्येष्ठ वारकऱ्याचे एसटी बसमध्ये आकस्मिक निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.