

Akola
esakal
अकोला: बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे उगवण न झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप शुक्रवारी (ता. १०) उफाळून आला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयात धडक देत संबंधित बियाणे कंपन्यांवर फौजदारी कारवाई, नुकसानभरपाई आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.