

Akola News
esakal
अकोला: शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या उघड्या व धोकादायक विहिरींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या विहिरींना जाळी बसवून त्या सुरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा आता महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत चर्चेस येणार आहे. सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या सभेत या विषयावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.