

Akola News
esakal
अकोला: जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे एक हजार ४३ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केला. परंतु जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत असल्यानंतर सुद्धा अद्याप संयुक्त पंचनाम्यांचा अंतिम मदत प्रस्ताव जिल्हास्तरावर रखडला आहे. प्रस्तावाला विलंब होत असल्याने शासनस्तरावरून मदत निधी मंजुरीसाठी सुद्धा विलंब होईल. त्यामुळे याकडे प्रशासानातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.