

Akola News
esakal
अकोला: उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना होणारी भटकंती आता थांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ४३ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या ४३ उपाययोजनांना जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. या अंतर्गत नवीन विंधन विहिरींची कामे हाती घेतली जाणार असून त्यासाठी तब्बल ४४ लाख ४४ हजार ६८१ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.