शिवसेना खासदार आणि भाजप आमदारांच्या धुमचक्रीनंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

Akola Washim Marathi News ShivSena MP Bhavana Gawli and BJP MLA Patnis argument now after allegations
Akola Washim Marathi News ShivSena MP Bhavana Gawli and BJP MLA Patnis argument now after allegations

वाशीम  : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. या विकोपामुळे एकच खळबळ उडाली. वाशीम यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना  गवळी  आणि  कारंजा  मतदार  संघाचे भाजपचे  आमदार राजेंद्र पाटणी  यांच्या  मधील राजकीय वैर तसं जूनेच.  

मात्र ,वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन येथे आज (ता.26)  जिल्हा आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी  या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित  राहणार होते.  त्यापूर्वी  विकास कामात अडथला  निर्माण करून  शिवसेनेने  आणलेल्या  विकास  कामाला  बाधा  निर्माण का करता  म्हणत,  खासदार  भावना  गवळी आणि आमदार राजेंद्र  पाटणी  आमने सामने  आले  आणि  तू तू मै मै झाली.

या दरम्यान  शिविगाळ झाली.  तर शिवसेनेच्या   कार्यकर्ते  आमदार पाटणी  यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला.  आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशीम पोलीस ठाण्यात खासदार भावना गवळी यांनी धमकी दिल्याची  तक्रार दाखल केली.  

 आता दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदामध्ये आमदार पाटणी यांनी विकास कामे अडविले नसल्याचा दावा केला तर, विकास कामांमध्ये अडथळा आणला तर जनतेसाठी अडवणुकीचा समाचार घेणे ही आमची संस्कृती असल्याचा दावा खासदार गवळी यांनी केला आहे.

वाशीम-यवतमाळ च्या सेनेच्या खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन जिल्हा आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित होते. मात्र, या बैठकीपूर्वी विकास कामात अडथला निर्माण करून शिवसेनेने आणलेल्या विकास कामाला बाधा निर्माण का करता? म्हणत खा. भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आमने सामने आले आणि, तू-तू-मै-मै झाली.

यावेळी उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात काही शहरांमध्ये तणाव निर्माण झाला असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनूचित प्रकार घडला नाही. यानंतर आज आमदार पाटणी यांनी पत्रकार परीषद घेवून खा. गवळी यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. खासदार भावना गवळी यांनीही विकासकामात अडथळा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

रिसोड, मालेगाव, मंगरुळपीरात बंदचा फज्जा
आ. राजेंद्र पाटणी व खा.भावना गवळी यांच्यातील बाचाबाचीच्या प्रकारावरुन रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर येथे भाजपाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. मालेगाव येथे काही काळच व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती तर मंगरूळपीरात बंदचा फज्जा उडाला. मानोऱ्यात भाजपच्या वतीने निषेण रॅली काढण्यात आली होती.तर रिसोड येथे बंदला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

लोकशाहीत असले प्रकार क्लेषदायक ः आमदार पाटणी
जिल्ह्यातील विकासकामांना आपण कधीच विरोध केला नाही. याऊलट विकास कामांसाठी सरकार सोबत प्रशासनासोबत भांडत आलो. परंतु, खासदार भावना गवळी यांनी मंगळवारी जी भूमिका घेतली ती असमर्थनीय तेवढीच क्लेषदायक आहे. असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले. खासदार गवळी व आमदार पाटणी यांच्यातील वाद व पोलसि तक्रारीनंतर बुधवारी (ता.२७) आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपली भूमिका स्पष्ट करतांना आमदार पाटणी पुढे म्हणाले की, मागील दोन दशकापासून आपण जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहोत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच नेत्यांच्या विरोधात मी निवडणुका लढलो. आमचे आपसात काही राजकीय मतभेद असतीलही परंतु, अशी व द्वेषी भूमिका मी किंवा अन्य कुणी घेतली नाही. परंतु खासदार भावना गवळींचे हे कृत्य असंसदीय व निंदनीय आहे. खासदार गवळींनी माझ्या विरोधात केलेली तक्रार धादांत खोटी असुन त्यात कुठलीही सत्यता नाही खरतर खासदार गवळी ह्याच विकास कामांना अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोपही शेवटी आमदार पाटणी यांनी केला. यावेळी भाजपचे आमदार लखन मलिक, भाजयुमोचे राजू पाटील राजे व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वसामान्यांची अडवणूक सहन करणार नाही : खासदार भावना गवळी
सर्वसामान्य जनतेशी बांधीलकी म्हणून आम्ही सरकार सोबत भांडून जिल्ह्यासाठी विकासकामे आणायची, आणि स्वतःच्या हितसंबंधापोटी कारण नसतांना आमदारांनी विरोध करून त्यात अडथळे आणायचे. अशामुळे आम्ही जनतेची कामे कशी करणार? यावर आम्ही प्रश्न विचारला तर, काय चुकीचं केलं असा सवाल खासदार भावना गवळी यांनी केला. आमदार पाटणी यांच्याशी झालेल्या वादानंतर खा. गवळी पत्रकारांशी बोलत होत्या. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आम्ही कुणालाही रस्त्यावर जाब विचारणार ही स्व. बाळासाहेबांची शिकवण असुन शिवसेनेची स्टाईल आहे. असे सांगून खासदार गवळी म्हणाल्या की, संपूर्ण महाराष्ट्रात गुंठेवारी नियमीत व खरेदी प्रक्रिया सुरू असताना केवळ वाशीम जिल्ह्यात गुंठेवारीचा प्रश्न कायम आहे. गरीबांना निवाऱ्याचा प्रश्न भेडसावत असतांना स्वतःच्या ले-आऊटमध्ये शासकीय निधीमधून भौतीक सुविधा देत शासकीय निधीचा गैरवापर करतांना यांना कुठलीही बांधीलकी नाही. या सर्व बेबंदशाहीची आपण मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे खासदार गवळी यांनी सांगीतले. आपण एक जागरूक लोकप्रतिनीधी या नात्याने आमदाराच्या मर्मावर बोट ठेवलं म्हणून हा राग काढल्याचे खासदार गवळी म्हणाल्या. आम्हाला संस्कृतीची भाषा शिकविणाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी बाजारपेठ बंद, जाळपोळ करून जनतेस वेठीस धरलं, तेंव्हा कुठे होती यांची संस्कृती, नियम व कायदा असा सवालही शेवटी खासदार गवळी यांनी केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, महिला आघाडी प्रमुख मंगलाताई सरनाईक, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रवि भांदुर्गे, शहराध्यक्ष गजानन ठेंगडे आदींची उपस्थिती होती.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com