

Akola
esakal
अकोट: गेल्या दोन महिन्यापासून अकोट शहरात महावितरणचा मनमानी कारभार पाहायला मिळत असून, वाटेल त्या वेळेस तासतास शहरातील वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार सुरू आहे. अशातच रविवारी (ता.७) वीजपुरवठा खंडित झाल्याचा थेट परिणाम शहराच्या पाणी पुरवठा वितरणाला बसला. संपूर्ण शहराला एक दिवस उशिरा पाणी पुरवठा करण्याची वेळ माजीप्रावर आली. त्यामुळे महावितरणच्या एकूणच कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.