

Akola News
esakal
बाळापूर: समाजात आजही बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र, पोलिस प्रशासन आणि चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या सतर्कतेमुळे उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत होणारा एक बालविवाह रोखण्यात यश आले आहे. ऐन विवाहाच्या धामधुमीत प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने परिसरात या कारवाईची मोठी चर्चा रंगली आहे.