

Akola News
esakal
बाळापूर: सोमवारी (ता.३०) सायंकाळच्या सुमारास बाळापूर तालुक्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. या नैसर्गिक संकटामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती पिकांचे, विशेषतः फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.