

Akola News
esakal
बाळापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘पंतप्रधान आवास योजने’ला भ्रष्टाचार आणि वसुलीचे ग्रहण लागले आहे. बाळापूर तालुक्यात घरकुल मंजुरीसाठी सरपंच आणि संबंधित अभियंत्यांकडून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असून, घरे न बांधताच कागदोपत्री ‘जिओ टॅगिंग’ उरकून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.