
बुलडाणा : खरीप हंगाम २०२५ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके मिळावी, यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने व्यापक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १४ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यात प्रत्येक तालुक्यासाठी १ आणि जिल्हास्तरावर १ भरारी पथकाचा समावेश आहे. दरम्यान सन २०२४-२५ मध्ये बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री केल्याप्रकरणी ३५० परवाने रद्द करण्यात आले.