ऑनलाईन मुळे बिघडले मुलांचे हस्ताक्षर

लिहण्याची गतीही मंदावली
Handwriting
Handwritingfile photo

शिरपूर जैन (जि.वाशीम) ः गतवर्षापासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. यामध्ये दीड वर्षापासून केवळ मोबाईलचा उपयोग करून ऑनलाईन शिक्षण होत आहे. लिहिण्याची सवय नसल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर कमालीचे बिघडत चालले आहे.

वळणदार अक्षर येत नसून लिहिण्याची गती ही मंदावली आहे. पालक वर्गही याकडे फारसा लक्ष द्यायला तयार नसल्याने विद्यार्थी देखील दुर्लक्ष करीत आहेत. दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा जवळ आल्या असून, परीक्षेतील सर्व प्रश्न सोडविता येणार की नाही? याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे.

प्रश्न, उत्तरे व गृहपाठ लिहिण्याची सवय राहिली नसल्याने, लेखी परीक्षेला अडचण येणार आहे. मूल्यमापन लेखी परीक्षेवर होत असल्याने लेखी पेपर सोडवण्यासाठी तीन तासाच्या काळात पेपर देण्यासाठी हा सराव गरजेचा आहे. ऑनलाईन मुळे सुटत असलेली लिखानाची सवय परत होण्यासाठी शिक्षक व शाळांनी लेखी सराव करून घेतल्यास ही अडचण दूर होईल.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com