अकोला - शहरातील एका नामांकित चिटफंड कंपनीकडून ‘बी.सी.’चे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. कंपनीकडून पैसे मिळत नसल्याने संबधित ग्राहकांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली आहे..कंपनीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची तक्रार जया जयंत देशमुख यांच्यासह काही महिला ग्राहकांनी केली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर साईराम कुरीज प्रा. लि. कंपनीच्या संचालकांनी हा आरोप खोटा असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे याप्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे..अकोला जिल्हा महिला काँग्रेसच्या पदाधिकारी जया देशमुख यांनी तक्रारदाराने आणि त्यांच्या ओळखीच्या ग्राहकांनी या कंपनीच्या विविध चिट-ग्रुपमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बी.सी. चे ड्रॉ काढणे बंद झाले असून, ग्राहकांना त्यांची हक्काची रक्कम देण्यास कंपनी टाळाटाळ करत आहे..गेल्या ११ महिन्यांपासून नियमित भरणा करूनही कंपनीने गुंतवणुकीची कोणतीही अधिकृत पावती किंवा पासबुक दिलेले नाही, असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार आणि त्यांच्या ग्राहकांचे स्वाक्षरी केलेले कोरे चेक सध्या कंपनीकडे आहेत..या धनादेशांचा भविष्यात गैरवापर होऊ शकतो, अशी भीती सौ. देशमुख यांनी व्यक्त केली असून ते चेक परत मिळवण्याची मागणी केली आहे. कंपनीत बेकायदेशीर व्याजाचे व्यवहार चालतात आणि गुंतवणुकीचे पैसे मागितले असता वेगवेगळे नियम सांगून फसवणूक केली जाते, असेही तक्रारीत म्हटले आहे.या कंपनीविरोधात अनेक गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत. तक्रार केल्यानंतरही वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप सौ. देशमुख यांनी केला आहे..या प्रकरणात आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने सौ. देशमुख यांनी खदान पोलिसांना या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. खदान पोलीस या अर्जाची दखल घेऊन पुढील कायदेशीर कारवाई काय करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वस्तू व सेवा कर विभागासह पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास करून संबधितांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे..कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्नसाईराम कुरीज प्रा.लि. कंपनीने कुणाचीही फसवणूक केलेली नाही. उलट जया देशमुख ह्या कंपनीला बदनाम करीत आहेत. त्यांनी काही महिलांच्या नावावर बी.सी. उचलली आहे. त्यांनी ते पैसे भरलेले नाहीत. त्यांच्याच अंगावर कंपनीचे ५८ लाख ८१ हजार, ८०० रुपये आहेत. त्यांचे कंपनीकडे फक्त ९ लाख ७६,०२० रुपये बाकी आहेत. त्यांनी आधी व्यवहार क्लिअर करावा नंतरच कंपनी राहिलेले पैसे परत करेल. कंपनीने ग्राहकांची कुठलीही फसवणूक केलेली नाही. कंपनी नियमानुसार काम करीत आहे.- विद्या गिरी, संचालक, साईराम कुरीज प्रा.लि. कंपनी, अकोला..खदान पोलिस स्टेशनला जया देशमुख यांची तक्रार प्राप्त झाली आहे. प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशी अंती योग्य ती कारवाई केली जाईल.- मनोज केदारे, पोलिस निरिक्षक, खदान, अकोला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.