डोणगाव (बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये अचानक झालेल्या वारा व गारपिटीमुळे परिसरात आरेगाव, मादणी, डोणगांव, जवळा, अंजनी बुद्रूक या शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.
डोणगांव भाग १ मधील अल्पभूधारक शेतकरी गोपाल कुटे व आरेगाव येथील किरण परशराम साखरे यांच्या शेतातील संपूर्ण पपईची तसेच राम निबांजी वायाळ या शेतकर्यांच्या कांदा पिकांचे सुद्धा नुकसान झाले. बर्याच शेतकर्यांना शासनाने पीक विमा सुद्धा दिलेला नाही. कंपनी शेतकर्यांना विमा देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. मात्र, शासनाने संबंधित कंपनीवर कार्यवाही केलेली नाही. परंतु, शेतकर्यांना दिलासा आतातरी द्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी डॉ. टाले यांनी शेतकर्यांना सांगितले की, या परिस्थितीत सोबत असून, प्रशासन व शासनाकडून मदत मिळवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी गोपाल कुटे, परशराम साखरे, रामेश्वर वायाळ, गजानन वायाळ, कृषी सहाय्यक सुनील बोंद्रे आदी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.