Akola News : ढगाळ वातावरणामुळे कापशी तालुक्यातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

शेतकरी चिंताग्रस्त; पीक वाचविण्यासाठी कीडनाशकांची फवारणी
akola
akolasakal

कापशी : गेले आठवड्यापासून सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका यासह भाजीपाला पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीडनाशकांची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न अकोला तालुक्यातील कापशी रोड येथील शेतकरी करीत आहेत.

पिंकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी, या वातावरणात काय उपाय करावे याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शनाचा अभाव दिसून येत आहे. गेले वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आलेले आहे. त्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे हरबरा कापूस, तूर, पिकांचे मोठे नुकसान झाले तर शेकडो एकर शेतीची पुन्हा नव्याने हरबरा पेरणी करावी लागली. त्यामुळे नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यास होतार होताच.

मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिके वाया जाण्याची धास्तीने कापशी रोड, चिखलगाव, माझोड, कापशी तलाव आदी गावांतील शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. रब्बी हंगामासाठी विहिरींमध्ये पाणी आहे, पण रब्बीतील गहू आणि हरभऱ्याच्या वाढीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा विपरित परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. स्वच्छ वातावरण आणि गारठा असेल तरच गव्हाची आणि हरभऱ्याची वाढ जोमदार होऊ शकेल. पावसाळी वातावरण आणि ढग कायम राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बीचे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.

यावर्षी कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. त्याचबरोबर गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना देखील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. मात्र, गेले आठवड्याभरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रब्बी पिकांना रोगराईने ग्रासले आहे. तर गव्हाची पेरणी होऊन तीन आठवडे ते एक महिना होत आला. मात्र पुरेशा थंडीअभावी गव्हाची वाढ देखील खुंटली आहे. दोन दिवसांपूर्वी काही ठिकाणी पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे या वातावरणामुळे गव्हावर तांबेरा तर हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागला आहे.

असेच वातावरण काही दिवस टिकून राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिके देखील वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका गहू व हरभरा या पिकांना बसण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे मावा, अळी बरोबरच रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. हतबल होत येथील शेतकरी महागडी कीडनाशके घेऊन ती पिकावर फवारणी करीत आहेत.

- गणेश विठ्ठलराव चतरकर, शेतकरी कापशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com