

Akola News
esakal
बाळापूर: भीषण उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या असतानाच, खिरपूरी येथील मुख्य बसस्थानकावरील हातपंप गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत धूळ खात पडला आहे. विशेष म्हणजे, जमिनीखाली पाण्याचा मुबलक साठा असतानाही केवळ प्रशासकीय दुर्लक्षामुळे हा हातपंप बंद असल्याने प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.