

MLA Randhir Savarkar discusses the restructuring of the Agriculture Department with officials at the Agriculture Minister’s office.
Sakal
अकोला : राज्याच्या कृषी विभागाचा पुनर्रचित आकृतीबंध स्थगित करून भविष्यातील कृषी क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन नव्याने आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. २०) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सावरकर यांची बैठक झाली.