अकोला ः अकोल्यात महिला-मुली सोबतच पुरुष, मुले बेपत्ता होण्याचे प्रकरण काही नवे नाही. असे असताना जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत 37 जणांचे अपहणर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण झालेल्यांची टक्केवारी भयावह आणि तेवढीच चिंताजनक जरी वाटत असली तरी या अपहरण झालेल्यांचा तपास लावण्यात अकोला पोलिसांना 89 टक्के यश आले आहे. मात्र, अपहरण होण्याच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना आधीपेक्षा अधिक कार्यक्षम होऊन अलर्ट राहणे गरजेचे आहे.
अकोला जिल्ह्यात बेपत्ता मुलींचे प्रकरण मोठ्या प्रमाणात नुकतेच गाजलेले आहे. दाखल आणि अदाखल झालेल्या प्रकरणाचा विचार करता जिल्ह्यातून दरदिवसाला एक पुरुष-महिला बेपत्ता होत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षांत 545 अपहरण झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. यामध्ये 2018 आणि 2019 या दोन वर्षात सर्वाधिक अपहरण झाले असल्याचे दिसून येत आहे. असे जरी असले तरी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत 37 जणांचे अपहरण झाले असून, यापैकी 33 जणांना शोधून काढून आणण्यात यश आले आहे.
अशी आहे धक्कादाय आकडेवारी
वर्ष अपहरण शोधलेले टक्केवारी
2015 73 71 97
2016 80 79 99
2017 96 96 100
2018 133 131 98
2019 126 122 97
2020 37 33 89
टीव्ही, इंटरनेटचा घातक परिणाम
अपहरण करण्याची मानसिकतेला टीव्ही, इंटरनेट आणि बदलेली सामाजिक परिस्थिती कारणीभूत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पळून गेलेल्यांपैकी काही जणांचे अपहरण झाले असल्याची शक्यता असते. अशा विकृत मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज निर्माण झाली आहे. तर पालकांनीही आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या प्रत्येक बारीक-सारीक हालचालींवर लक्ष देणे गरजेचे आहे.
4 गुन्हे अनडिटेक्ट
अकोला पोलिस विभागातून सहा महिन्यांत 37 जणांचे अपहरण झाले असल्याची माहिती आहे. यापैकी 33 जणांना शोधून काढण्यात आले आहे. मात्र, अद्यापही चार गुन्ह्यांचा उलगडा झाला नसून, याकडे अकोला पोलिस विभागाला लक्ष द्यावे लागणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.