एका मंत्र्याचा अपमान होत असेल, तर कॉँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं- प्रकाश आंबेडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश आंबेडकर

एका मंत्र्याचा अपमान होत असेल, तर कॉँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं- प्रकाश आंबेडकर

अकोला : विजय वडेट्टीवारांनी अनलॉक जाहीर केल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यात लॉकडाऊन कायम असल्याचं प्रसिद्धीपत्रक काढलंय. त्यामुळे ठाकरे सरकारमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आलीय. भाजपनं हा मुद्दा उचलून धरत रान पेटवलंय, तर सत्ताधाऱ्यांमध्येही एकमेकांना चलबिचल पाहायला मिळत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. (Prakash Ambedkar's attack on the Mahavikas Aghadi government)

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला मोलाचा सल्ला दिलाय. एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलाय. एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीका ही करायची अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाही, असंही त्यांनी सुनावलंय. वडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केलं, तर मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा निर्णय बदल करून लागू केला, तर हा मंत्र्यांचा अपमान आहे. म्हणून दोघांपैकी एकाने राजीनामा द्यावा, असा सल्ला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय.

तसेचं आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्याचा वापर करून काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केलं, मात्र मुख्यमंत्र्यांनी ते रद्द केलं, हे चुकीचं असून आपत्ती व्यवस्थापनाचे निर्णय लागू झाले पाहिजेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे आणि हे महाराष्ट्र संस्कृतीला न पटणारं आहे. कारण सध्या आपत्ती व्यवस्थापनाचा हाच निर्णय लागू झाला तर मुख्यमंत्र्यांची नाचक्की आहे. यांच्या खेळामध्ये सामान्य भरडला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी यांनी केलाय.

संपादन - विवेक मेतकर

Prakash Ambedkar's attack on the Mahavikas Aghadi government

टॅग्स :AkolaPrakash Ambedkar