
अकोला : अकोला जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः पालेभाज्या आणि फळवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. प्रामुख्याने कोथिंबीर, पालक, मिरचीसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.