

Yavatmal Farmer Tragidy
esakal
राळेगाव (जि. यवतमाळ): जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतानाच राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. सततची नापिकी, वाढते कर्ज आणि शेतीसाठी आवश्यक वीजजोडणी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या ज्ञानेश्वर मालेकर (वय ६२) यांनी गुरुवारी (ता. २३) पहाटे सुमारे पाच वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर मालेकर यांनी आपल्या पाच एकर शेतीसाठी लाखो रुपये खर्च करून बोअरवेल खोदली होती.