GST  
देश

दुहेरी नुकसानीच्या मुद्‌द्‌यावर सहमती नाहीच

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प तोंडावर असताना जीएसटी परिषदेमध्ये अजूनही दुहेरी नियंत्रण आणि नुकसान भरपाईच्या मुद्‌द्‌यावर केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती होऊ शकलेली नाही. या परिषदेच्या आजच्या बैठकीमध्ये केवळ आयजीएसटी विधेयकावर आणि महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश यांसारख्या किनारपट्टीवरील राज्यांना जीएसटीमुळे होणाऱ्या हानीवर चर्चा झाल्याचे समजते. परिषदेची पुढील बैठक 16 जानेवारीला होण्याची शक्‍यता आहे.


वस्तू आणि सेवाकर कायद्याच्या अंमलबजावणीवरील चर्चेचे भिजत घोंगडे कायम असून, नुकसान भरपाईच्या मुद्‌द्‌यावर राज्ये अजूनही आक्रमक आहेत. आयजीएसटी विधेयकाच्या मसुद्यावर आज परिषदेच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असली, तरी सहमती होऊ शकली नाही. एवढेच नव्हे; तर दुहेरी नियंत्रणाच्याही (ड्युएल कंट्रोल) मुद्‌द्‌यावर आज चर्चा झाली नाही. आयजीएसटीमध्ये राज्यांच्या हितांची दखल घेण्यात आली नसल्याचे राज्यांचे म्हणणे आहे; तसेच राज्यांच्या भरपाईसाठी प्रस्तावित 55 कोटींचा निधी हा नोटाबंदीनंतरच्या वातावरणात पुरेसा नाही. चैनीच्या वस्तूंवर अतिरिक्त करआकारणीतून नुकसान भरपाई देण्याचा केंद्राने पर्याय पुढे केला असला तरी निधी अपुरा आहे. शिवाय अतिरिक्त निधी केंद्राकडे कोठून येणार, यावर राज्यांची भूमिका आक्रमक आहे. दुहेरी नियंत्रणपद्धतीमध्ये जीएसटीअंतर्गत दीड कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल असलेले करदाते जीएसटीअंतर्गत राज्यांच्या अखत्यारीत यावेत, अशी राज्यांची मागणी आहे; तर सेवाकरावर केंद्र सरकारला पूर्ण नियंत्रण हवे आहे. मात्र सेवाकरामध्ये दुहेरी नियंत्रणाची राज्यांची मागणी आहे.

सहा क्षेत्रांबाबत चर्चा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी परिषदेच्या बैठकीनंतर सागितले, की आजच्या बैठकीमध्ये सहा आर्थिक क्षेत्रांशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. टेलिकॉम, बॅंकिंग, इन्शुरन्स आणि आयटी (माहिती तंत्रज्ञान) या क्षेत्रांना जीएसटीअंतर्गत केंद्राच्या अखत्यारीत नोंदणी (सेंट्रलाइज्ड रजिस्ट्रेशन) हवी आहे; तर केरळचे अर्थमंत्री डॉ. टी. एम. थॉमस इसाक यांनी सप्टेंबरमध्ये जीएसटी लागू होऊ शकतो, असे सांगितले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राज्यांना दीड कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांवर करआकारणीचे अधिकार द्यावेत, अशी मागणी केली; तर नोटाबंदीमुळे पश्‍चिम बंगालचे प्रचंड नुकसान झाल्याने केंद्राने भरपाई द्यावी, अशी मागणी राज्याचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT