आगामी वर्षामध्ये शाहरुख खान आणि आमीर खान यांचे शोज् तरी एकमेकांच्या मार्गात येणार नाहीये. कारण, आमीरचा शो "सत्यमेव जयते'चे दोन्ही सीझन्स प्रेक्षकांना आवडले. सध्या या शो च्या तिसऱ्या सीझनबद्दल चर्चा होत असून शाहरुख खानचा "टेड टॉक्स इंडिया-नयी सोच' हा शो दहा डिसेंबरपासून सुरू होत आहे.
"एसआरके'च्या शोला तारीख आणि वेळ मिळण्याआधी या दोन सुपरस्टार्सच्या शोज्च्या वेळांची टक्कर होईल, अशी चर्चा होती. पण सध्या तरी हे टळले आहे. आमीर आणि शाहरुख यांच्यात हल्ली परत एकदा मैत्री झाली असून आर्थिक तसेच व्यक्तिगत कारणांमुळे शोज्चा हा संघर्ष टळला आहे.
हे दोन्ही शोज् पूर्णपणे वेगळे असून त्यांच्यात तुलना करणे योग्य नाही. सूत्रांनी असेही सांगितले, "सत्यमेव जयते' हा शो भारतातील स्त्रीभ्रूणहत्या, बाल लैंगिक शोषण, बलात्कार, ऑनर किलिंग, कौटुंबिक मारहाण, व्यसन अशा विभिन्न समस्यांकडे लक्ष वेधतो तर "टेड टॉक्स'मध्ये प्रत्येक भागात एक विशेष संकल्पना असेल आणि देशाला प्रेरणा देणाऱ्या नवकल्पनांवर हा शो लक्ष केंद्रित करेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.