मुंबई

ओढ्यातून जीवघेणा प्रवास

CD

शहापूर, ता. १० (वार्ताहर) : तालुक्यातील खराडे ग्रामपंचायत हद्दीतील अंबरपाडाला जोडणारा पूल पुरामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे कातकरी वस्तीतील ग्रामस्थांना गळ्यापर्यंतच्या खोल पाण्यातून खराडे गावात यावे लागत आहे.
शेणवे-डोळखांब मुख्य रस्त्याजवळील खराडे गावातील अंबरपाडा आदिवासी वस्ती आहे. कातकरी समाजाची ४० घरे वर्षानुवर्षे वास्तव्यास आहेत. या आदिवासी वस्तीकडे जाण्यासाठी ओढा आहे. १३ वर्षांपूर्वी या ओढ्यावर लहान साकव बांधला होता, परंतु पावसाच्या पुरामध्ये वाहून गेल्याने रहिवाशांना गळाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. ६० मीटर लांबीच्या या ओढ्यावर पूल व्हावा, अशी वारंवार मागणी केली जात आहे, पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूल उभारण्यात आला नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
------------------------------------------
धोकादायक मार्गाने प्रवास
पावसाळ्यात ओढा ओलांडण्याची विदारक स्थिती असल्याने शाळेत जाण्यासाठी येथील विद्यार्थी धोकादायक मार्गाने प्रवास करीत आहेत. जोडरस्ताही नसल्याने काट्याकुट्यातून तर कधी गवतातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वस्तीकडे जाणारा रस्ता उभारण्याची मागणी खराडे ग्रामपंचायतीचे सदस्य रुपेश चौधरी तसेच रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन विशे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheesh Mahal Delhi: दिल्लीतील 370 वर्षे जुने 'शीशमहाल' अखेर उघडले! जाणून घ्या तिकिट, वेळ आणि विशेष माहिती

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2025

मोठी बातमी! सोलापूर जिल्हा बॅंकेचे ६ शाखाधिकारी निलंबित; बनावट सोन्यावर दिले लाखोंचे कर्ज; माळशिरस, मंगळवेढा, सांगोल्यातील शाखांमधील धक्कादायक प्रकार

Panchang 11 July 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

व्रत आरोग्याचे!

SCROLL FOR NEXT